* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KARN, THE SURYAPUTRA (SON OF GOD) WHO SPENDS HIS WHOLE LIFE BEING MOCKED AS SUTPUTRA. KARN, THE JYESHTHA KAUNTYA(ELDEST SON OF KUNTI, THE QUEEN MOTHER) WHO IS BETTER KNOWN AS RADHAY. KARN WHO WAS EQUALLY ADMIRED AND LOVED BY PANCHALI (THE EMPRESS) AND VRISHAALI. KARN, THE INVINCIBLE, BORN WITH A SHEATH WHICH COULD NEVER BE PENETRATED IS THE MOST SOFT HEARTED PHILANTHROPIST;KARN,THE ONE WHO NEVER RETURNED ANYBODY FROM HIS DOOR EMPTY HANDED BUT COULD NEVER FILL UP HIS OWN HANDS .
असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarPratibha Mahajan - Mali

    मृत्युंजय ही मराठीतील एक अजरामर कलाकृती आहे. 2005 ला डी.एड् ला असताना वाचली होती... पण आता परत वाचावीशी वाटली... 1800 पानांचे हे हस्तलिखित पूर्णत्वास नेण्यासाठी लेखकांना 7 वर्षांचा कालावधी लागला.प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक िवाजी सावंत.... लेखकांच्या अफाट मेहनतीला,तळपत्या लेखनीला व वाचकाला खिळवून ठेवणार्या लेखनशैलीला मानाचा मुजरा!!! कर्णकथा,दानशूर कर्ण,ज्येष्ठ कौतेय,राधेय सूर्यपूत्र कर्ण ! कर्ण ! कर्ण ! त्याचा त्याग,त्याने भोवलेल्या यातना,सोसलेले कष्ट,सूर्यपूत्र असूनही त्याला आयुष्यभर सूतपुत्राची अवहेलना सहन करावी लागली,त्याचे निव्वळ मित्रप्रेम,त्याचा आदर्शवाद.....कादंबरी मधील पात्रांचे आत्मकथन सारं काही खिळवून ठेवणारं आहे. ...Read more

  • Rating StarVishwanath Joshi

    `कर्णा`, तु `मृत्युंजय` नव्हतास! काही पुस्तकं मनावर गारूड करतात , सहजासहजी अशी गारुडं मग खाली उतरवता येत नाहीत . त्या पुस्तकातील काही व्यक्तिरेखाही मनावर प्रभाव करतात . एकुणच ते पुस्तक वाचून झाल्यावरही आपण त्या पुस्तकाच्या धुंदीतच असतो! माझ्या ाचनात अशी फार पुस्तके आली नाही पण काही पुस्तकांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . त्यातीलच एक पुस्तक म्हणजे `मृत्युंजय`!! कै. `शिवाजीराव सावंत` यांची अजरामर साहित्यकलाकृती! साधारणपणे ज्यांना मराठी साहित्याची गोडी नाही त्यांना मृत्युंजय वाचायला द्यावी . मराठी भाषेची गोडी सहज लागेल . आज मराठी वाचकांमध्ये असे क्वचित वाचक असतील ज्यांनी मृत्युंजय वाचली नाहीये . `वि. स. खांडेकरां`च्या `ययाति`नंतर इतकं शब्दसौदर्य असलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय होय! इथेच एक प्रांजळ कबुलीजबाब देऊ इच्छितो की इतिहासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मृत्युंजयचे स्थान हे शुन्य आहे . व्यासांच्या महाभारतात काही प्रसंग नाहीच आहेत जे मृत्युंजयमध्ये आहेत . त्यामुळे मृत्युंजय मधील शब्द अन शब्द खरा आहे असा गैरसमज करुन घेऊ नये! मृत्युंजयची ओघवती भाषा , सावंतांची ती अनोखी शब्दरचना , निसर्गांचं केलेलं वर्णन , या सर्व बाबींचा मात्र विचार केला तर मृत्युंजयचे स्थान फार वरचे आहे हे निश्चित! काही पुस्तकं अशी असतात जी वाचायला घेतल्यावर खाली ठेवावी असं वाटतच नाही , मृत्युंजय अशांमधीलच एक आहे! मृत्युंजय या कादंबरीमुळे मराठी भाषेला एक संजीवनी मिळाली . मराठी भाषेचे वाचक वाढले . लोकांना पुन्हा एकदा कादंबर्‍यांनी भुरळ घालायला सुरुवात केली असे अनेक फायदे मृत्युंजयचे आहेत पण तेवढेच तोटे देखील आहेत . मृत्युंजय ही `महाभारत`कालीन महारथी `कर्णा`ची भावस्पर्शी कथा आहे . इथे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण ती कादंबरी वाचत जातो . सुरुवातीला स्वत: कर्ण आपली कथा सांगायला सुरुवात करतो . त्याच्या त्या गावाचं - `चंपानगरी`चं तर वर्णन इतकं सुरेख आहे की इथुनच ही कादंबरी आपल्या मनावर पकड घेते . मग `कुंती` कर्णाविषयी सांगते . खरं सांगायचं तर वैयक्तिकपणे कुंतीचं सांगणं मला वाचायला कंटाळा देणारं होतं! पण कर्णाची जन्मकथा आपल्याला कुंतीच सांगते आणि त्यावेळी सावंतांनी तीथे अगदी प्रसंगानुरूप लेखणी वापरल्यामुळे कर्ण भाव खाऊन जातो! कर्णाची पत्नी `वृशाली` ही देखील कर्णाविषयी सांगते आणि कर्ण आणि वृशाली दोन्ही सहानुभूती मिळवतात. स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं! पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य . पतीच्या जीवनाची अर्धी बाजु सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगल वेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते . अशा वाक्यांमुळे माझ्या मनात वृशालीने एक वेगळाच आदर मिळवला . शिवाय `शोण`, `दुर्योधन` यांची मनोगतं देखील भारावून टाकणारी होती . शेवटचं `श्रीकृष्णा`चं मनोगत वाचताना मध्येच डोळे डबडबलेले होते! शेवटी मृत्युंजय वाचून पुर्ण केलं! मृत्युंजय वाचल्यावर एक वर्णनविलक्षण भावना मनात चेतवली गेलेली होती . मृत्युंजय वाचल्यावर `कर्ण` आमच्यासाठी `हिरो` झाला होता . एक कर्ण आणि दुसरा `दिलीप कुमार` हे त्या काळातील आमचे हिरो होते . मृत्युंजय मधल्या अनेक वाक्यांनी मनावर जबरदस्त पकड घेतली होती . "तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन" यांसारख्या वाक्यांनी मनाचा तळठाव व्यापला होता . मृत्यंजयमधील काही प्रसंग वाचल्यावर मनामध्ये एक विषण्णता जाणवली . जन्म झाल्यावर त्याला आईनेच आपल्यापासून दूर केलं होतं . `गुरु द्रोणां`चा आदर करुनही द्रोणांनी त्याच्या पदरी उपेक्षाच टाकली होती . तो ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी महेंद्र पर्वतावर `भार्गव परशुरामां`कडे गेला आणि त्याने सर्वस्व पणाला लावले पण पुन्हा एकदा त्याच्या पदरात जळजळीत निखारेच पडले आणि एक धगधगता शाप! शेवटी अंगावर धारण केलेली कवच - कुंडलेही इंद्राने दान म्हणून मागीतली आणि त्याच्यासोबत छळ केला आणि हे सगळं झाल्यावर कुंती त्याच्यासमोर आली! कुंतीसाठी त्याने एकाच म्हणजे फक्त अर्जुनालाच वधेन बाकीच्यांचा वध करणार नाही असं वचन दिलं! `गंगापुत्र भिष्मां`ची अवज्ञा होईल म्हणून हा रणधुरंधर पहिले दहा दिवस रणांगणात उतरला नाही! अर्जुनासाठी राखुन ठेवलेली `वैजयंती` त्याला `घटोत्कचा`वर सोडावी लागली . शेवटी नखं नसलेल्या सिंहासारखी त्याची अवस्था झाली होती! पण तरिही मनामध्ये अदम्य जिद्द ठेवून हा रणमार्तंड सेनानायक रणांगणात उतरला आणि पांडवांचे दुर्दै़वाचे दशावतार दिसु लागले . शेवटी कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाने त्याच्यावर बाण चालवला आणि एक वादळ शांत झाले! कुरुक्षेत्रावर सुर्यास्त झाला!! `कर्ण`पर्व समाप्त झाले होते!! कर्णाचं गारुड मनावर ठेवूनच मग पुन्हा एक दोनदा मृत्युंजय पूर्ण वाचुन काढलं . पुन्हा पुन्हा कर्णाने माझ्या मनात वादळ उठवलं! मधल्या काळात माझं वाचन वाढलं . विविध दृष्टीकोनातून मी महाभारत वाचु लागलो . प्रत्येक वेळी कर्ण वेगळा वाटत गेला असला तरीही मृत्युंजयमुळे मी भारावून गेलो होतो . मग पणशीकरांचं `कर्ण कोण होता?` हे पुस्तक वाचनात आलं . नंतर परम पुज्य `वरदानंद भारती` यांचे कर्णावरचे लेख वाचनात आलं . या दोन्ही पुस्तकांमध्ये कर्णाविषयी नकारात्मकता वाचायला मिळाल्यामुळे संदर्भासहित महाभारत वाचायला घेतले आणि कर्णविषयी सत्य हळुहळू समजत गेले . बुद्धीला ते सत्य पटत होते मात्र मनाला पटत नव्हते . मग मात्र मृत्युंजय मधील अवास्तव , काल्पनिकतेवर असलेला भर हे सगळं स्पष्ट झालं मग कर्णापेक्षा कितीतरी पटीने मला इतर व्यक्तिरेखा भावल्या . विशेषतः भीष्मांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . कर्ण हा कुणी महात्मा /वीरपुरुष नसुन तो खलपुरुष होता हे देखील मला चिंतन केल्यावर समजु लागलं . शेवटी माझ्या मनावर दीर्घ काळ राज्य करणारा कर्ण माझ्या मनातुन अखेर हद्दपार झाला!! सुरुवातीला कर्णाच्या कृतींचं आम्ही समर्थन करायचो . आता मात्र तसं करताना स्वता:हाचीच लाज वाटु लागली . द्रौपदीला तो भर सभेत वेश्या म्हणाला असं वाचताना पुर्वी आम्हाला काही विशेष वाटलं नव्हतं पण आता मात्र तो विचार करतानाही मन धजवत होतं! भार्गव परशुरामांना असत्य सांगुन अंधारात ठेवणार्‍या कर्णाची प्रवृत्ती किती हिणकस असावी असं वाटु लागलं . गरीब ब्राह्मणाची गाय मारुन कर्णाला काय मिळालं? स्वता:हाच्या धनुर्विद्येच्या टिमक्या मिरविणारा कर्ण गांधर्व युद्धात निष्पभ्र का ठरला ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आणि कर्ण हा माझ्या मनात इतिहासजमा होवुन बसला! आजही मी मृत्युंजय वाचतो पण कर्णासाठी नाही तर त्यातील अमोघ भाषेसाठी . साहित्य कलाकृतींमध्ये मृत्युंजय फार वर आहे मात्र त्यात इतिहास मिसळला गेला तर अज्ञानाचं प्रदुषण पसरतं. `श्रीमान योगी`/`छावा` किंवा मृत्युंजय या कादंबर्‍या अवश्य वाचाव्यात पण त्यातील काल्पनिकता ही खरी मानु नये . किमान सुज्ञ आणि विवेकी वाचकाने ही गोष्ट नोंद करुन घ्यावी! कर्णाशी माझं काहीच वैर नाही . तो पराक्रमी होता , त्याने अनेक दिग्वीजयही केले , त्याच्या दानशुरपणाला तोड नाही हे सगळं खरं पण तो अराजक प्रवृत्तीला पाठिंबा देणारा अधर्मी होता असं व्यासांनी म्हटलयं . आम्ही नाही!! आज एकुणच कर्णाकडे वळुन पाहताना जास्त काही म्हणावसं वाटतं नाही . दोन ओळीच खुप आहेत , कर्णा , तु मृत्युंजय नव्हतास रे! मृत्युंजय नव्हतास!! धन्यवाद! ...Read more

  • Rating StarDatta Shinde Patil

    एक वेळ अवश्य वाचावं असं पुस्तक

  • Rating StarSomnath Rathod

    आज जेव्हा शिवाजी सावंत यांची लोकप्रिय कादंबरी मृत्यूंजय वाचून समाप्ती झाली तेव्हा कळाले. "अंगराज कर्ण. सुतपुञ कर्ण. कौरव दिग्विजयी सेनापती कर्ण .जेष्ठ कौंतिया कर्ण. राधेय कर्ण . साक्षात इंद्रदेवाला आपल्या दारात याचक म्हणून उभा करणारा दानीर कर्ण आपला मिञ दुर्योधन व कौरव पराभूत होणार माहीत असताना मिञाला दिलेल्या शब्द खातीर शेवट पर्यंत जिगरांने लढणारा कर्ण. मृत्यू च्या दारात उभा असताना याचक वृद्ध ब्राम्हणाला स्वतःचे दोन सोन्याचे दात दगडाने तोडून देण्याचे मुलाला आदेश देणारा दानविर कर्ण प्रत्येक माणसात एक कर्ण असतोच..! १० दिवस डोक्यात गरागरा फिरणारा कर्ण आज डोक्यासह शांत झाला.! कादंबरी कार शिवाजी सांवत ना कोटि कोटि प्रणाम. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Purva

This book is written by Sudha Murthy, who is very famous for her simple writing but with the impact. There are 23 heartwarming short stories (mostly based in and around Karnataka). So like her other books, this book is also about the different good ad bad situations in the person`s life, wherein it gives a lot of insights about life, experiences, expectations, and so on. It focuses on: to achieve something, be grounded, be patient be a good listener, be defensive or attack whenever needed. All these stories are full of emotions, interesting and inspiring. The author has described various: प्लेसिस, characters, places, situations. It`s an easy read for anyone and everyone. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
राजेंद्र देशमुख, अमरावती.

जी. बी. देशमुख यांनी लिहीलेले "छाटितो गप्पा " हे पुस्तक वाचायला घेतले. थोडा वेळ वाचन करु हा उद्देश होता. पुस्तक वाचण्यास सुरूवात केली. या पुस्तकामध्ये ४५ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये लेखकाने केलेली मांडणी वाखाणण्या जोगी आहे. प्रत्येक ोष्ट वाचण्यास सुरूवात केल्या पासुन ती संपेपर्यंत तिच्या मधील उत्कंठा क्षणोक्षणी वाढत जाते. विषयाचा शेवट होईपर्यंत वाचन बंद करण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. लेखकाने शब्दांची अशी मांडणी केली आहे की प्रत्येक घटना आपला समोर घडत आहे व आपण त्याचे साक्षीदार आहोत अश्या प्रकारचा जिवंतपणा जाणवतो. `तोंडाचा कुंचला` ह्या गोष्टितील खर्रा व पान खाऊन, पीचकारी मारून रस्ते रंगवण्याच्या गुणाचे असेही वर्णन होऊ शकते हे कल्पनेच्या पलिकडचे आहे. ४५ गोष्टी पूर्ण होईपर्यंत वाचन सोडण्याची माझी इच्छा झाली नाही. मधे काही कामानिमीत्य ब्रेक घ्यावा लागला, तरी पण `ब्रेक के बाद` परत वाचन सुरू करून पुस्तक पूर्ण होई पर्यंत सोडले नाही. शब्दांमधे जिवंतपणा आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. ...Read more