* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KARN, THE SURYAPUTRA (SON OF GOD) WHO SPENDS HIS WHOLE LIFE BEING MOCKED AS SUTPUTRA. KARN, THE JYESHTHA KAUNTYA(ELDEST SON OF KUNTI, THE QUEEN MOTHER) WHO IS BETTER KNOWN AS RADHAY. KARN WHO WAS EQUALLY ADMIRED AND LOVED BY PANCHALI (THE EMPRESS) AND VRISHAALI. KARN, THE INVINCIBLE, BORN WITH A SHEATH WHICH COULD NEVER BE PENETRATED IS THE MOST SOFT HEARTED PHILANTHROPIST;KARN,THE ONE WHO NEVER RETURNED ANYBODY FROM HIS DOOR EMPTY HANDED BUT COULD NEVER FILL UP HIS OWN HANDS .
असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarPratibha Mahajan - Mali

    मृत्युंजय ही मराठीतील एक अजरामर कलाकृती आहे. 2005 ला डी.एड् ला असताना वाचली होती... पण आता परत वाचावीशी वाटली... 1800 पानांचे हे हस्तलिखित पूर्णत्वास नेण्यासाठी लेखकांना 7 वर्षांचा कालावधी लागला.प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक िवाजी सावंत.... लेखकांच्या अफाट मेहनतीला,तळपत्या लेखनीला व वाचकाला खिळवून ठेवणार्या लेखनशैलीला मानाचा मुजरा!!! कर्णकथा,दानशूर कर्ण,ज्येष्ठ कौतेय,राधेय सूर्यपूत्र कर्ण ! कर्ण ! कर्ण ! त्याचा त्याग,त्याने भोवलेल्या यातना,सोसलेले कष्ट,सूर्यपूत्र असूनही त्याला आयुष्यभर सूतपुत्राची अवहेलना सहन करावी लागली,त्याचे निव्वळ मित्रप्रेम,त्याचा आदर्शवाद.....कादंबरी मधील पात्रांचे आत्मकथन सारं काही खिळवून ठेवणारं आहे. ...Read more

  • Rating StarVishwanath Joshi

    `कर्णा`, तु `मृत्युंजय` नव्हतास! काही पुस्तकं मनावर गारूड करतात , सहजासहजी अशी गारुडं मग खाली उतरवता येत नाहीत . त्या पुस्तकातील काही व्यक्तिरेखाही मनावर प्रभाव करतात . एकुणच ते पुस्तक वाचून झाल्यावरही आपण त्या पुस्तकाच्या धुंदीतच असतो! माझ्या ाचनात अशी फार पुस्तके आली नाही पण काही पुस्तकांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . त्यातीलच एक पुस्तक म्हणजे `मृत्युंजय`!! कै. `शिवाजीराव सावंत` यांची अजरामर साहित्यकलाकृती! साधारणपणे ज्यांना मराठी साहित्याची गोडी नाही त्यांना मृत्युंजय वाचायला द्यावी . मराठी भाषेची गोडी सहज लागेल . आज मराठी वाचकांमध्ये असे क्वचित वाचक असतील ज्यांनी मृत्युंजय वाचली नाहीये . `वि. स. खांडेकरां`च्या `ययाति`नंतर इतकं शब्दसौदर्य असलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय होय! इथेच एक प्रांजळ कबुलीजबाब देऊ इच्छितो की इतिहासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मृत्युंजयचे स्थान हे शुन्य आहे . व्यासांच्या महाभारतात काही प्रसंग नाहीच आहेत जे मृत्युंजयमध्ये आहेत . त्यामुळे मृत्युंजय मधील शब्द अन शब्द खरा आहे असा गैरसमज करुन घेऊ नये! मृत्युंजयची ओघवती भाषा , सावंतांची ती अनोखी शब्दरचना , निसर्गांचं केलेलं वर्णन , या सर्व बाबींचा मात्र विचार केला तर मृत्युंजयचे स्थान फार वरचे आहे हे निश्चित! काही पुस्तकं अशी असतात जी वाचायला घेतल्यावर खाली ठेवावी असं वाटतच नाही , मृत्युंजय अशांमधीलच एक आहे! मृत्युंजय या कादंबरीमुळे मराठी भाषेला एक संजीवनी मिळाली . मराठी भाषेचे वाचक वाढले . लोकांना पुन्हा एकदा कादंबर्‍यांनी भुरळ घालायला सुरुवात केली असे अनेक फायदे मृत्युंजयचे आहेत पण तेवढेच तोटे देखील आहेत . मृत्युंजय ही `महाभारत`कालीन महारथी `कर्णा`ची भावस्पर्शी कथा आहे . इथे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण ती कादंबरी वाचत जातो . सुरुवातीला स्वत: कर्ण आपली कथा सांगायला सुरुवात करतो . त्याच्या त्या गावाचं - `चंपानगरी`चं तर वर्णन इतकं सुरेख आहे की इथुनच ही कादंबरी आपल्या मनावर पकड घेते . मग `कुंती` कर्णाविषयी सांगते . खरं सांगायचं तर वैयक्तिकपणे कुंतीचं सांगणं मला वाचायला कंटाळा देणारं होतं! पण कर्णाची जन्मकथा आपल्याला कुंतीच सांगते आणि त्यावेळी सावंतांनी तीथे अगदी प्रसंगानुरूप लेखणी वापरल्यामुळे कर्ण भाव खाऊन जातो! कर्णाची पत्नी `वृशाली` ही देखील कर्णाविषयी सांगते आणि कर्ण आणि वृशाली दोन्ही सहानुभूती मिळवतात. स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं! पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य . पतीच्या जीवनाची अर्धी बाजु सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगल वेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते . अशा वाक्यांमुळे माझ्या मनात वृशालीने एक वेगळाच आदर मिळवला . शिवाय `शोण`, `दुर्योधन` यांची मनोगतं देखील भारावून टाकणारी होती . शेवटचं `श्रीकृष्णा`चं मनोगत वाचताना मध्येच डोळे डबडबलेले होते! शेवटी मृत्युंजय वाचून पुर्ण केलं! मृत्युंजय वाचल्यावर एक वर्णनविलक्षण भावना मनात चेतवली गेलेली होती . मृत्युंजय वाचल्यावर `कर्ण` आमच्यासाठी `हिरो` झाला होता . एक कर्ण आणि दुसरा `दिलीप कुमार` हे त्या काळातील आमचे हिरो होते . मृत्युंजय मधल्या अनेक वाक्यांनी मनावर जबरदस्त पकड घेतली होती . "तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन" यांसारख्या वाक्यांनी मनाचा तळठाव व्यापला होता . मृत्यंजयमधील काही प्रसंग वाचल्यावर मनामध्ये एक विषण्णता जाणवली . जन्म झाल्यावर त्याला आईनेच आपल्यापासून दूर केलं होतं . `गुरु द्रोणां`चा आदर करुनही द्रोणांनी त्याच्या पदरी उपेक्षाच टाकली होती . तो ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी महेंद्र पर्वतावर `भार्गव परशुरामां`कडे गेला आणि त्याने सर्वस्व पणाला लावले पण पुन्हा एकदा त्याच्या पदरात जळजळीत निखारेच पडले आणि एक धगधगता शाप! शेवटी अंगावर धारण केलेली कवच - कुंडलेही इंद्राने दान म्हणून मागीतली आणि त्याच्यासोबत छळ केला आणि हे सगळं झाल्यावर कुंती त्याच्यासमोर आली! कुंतीसाठी त्याने एकाच म्हणजे फक्त अर्जुनालाच वधेन बाकीच्यांचा वध करणार नाही असं वचन दिलं! `गंगापुत्र भिष्मां`ची अवज्ञा होईल म्हणून हा रणधुरंधर पहिले दहा दिवस रणांगणात उतरला नाही! अर्जुनासाठी राखुन ठेवलेली `वैजयंती` त्याला `घटोत्कचा`वर सोडावी लागली . शेवटी नखं नसलेल्या सिंहासारखी त्याची अवस्था झाली होती! पण तरिही मनामध्ये अदम्य जिद्द ठेवून हा रणमार्तंड सेनानायक रणांगणात उतरला आणि पांडवांचे दुर्दै़वाचे दशावतार दिसु लागले . शेवटी कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाने त्याच्यावर बाण चालवला आणि एक वादळ शांत झाले! कुरुक्षेत्रावर सुर्यास्त झाला!! `कर्ण`पर्व समाप्त झाले होते!! कर्णाचं गारुड मनावर ठेवूनच मग पुन्हा एक दोनदा मृत्युंजय पूर्ण वाचुन काढलं . पुन्हा पुन्हा कर्णाने माझ्या मनात वादळ उठवलं! मधल्या काळात माझं वाचन वाढलं . विविध दृष्टीकोनातून मी महाभारत वाचु लागलो . प्रत्येक वेळी कर्ण वेगळा वाटत गेला असला तरीही मृत्युंजयमुळे मी भारावून गेलो होतो . मग पणशीकरांचं `कर्ण कोण होता?` हे पुस्तक वाचनात आलं . नंतर परम पुज्य `वरदानंद भारती` यांचे कर्णावरचे लेख वाचनात आलं . या दोन्ही पुस्तकांमध्ये कर्णाविषयी नकारात्मकता वाचायला मिळाल्यामुळे संदर्भासहित महाभारत वाचायला घेतले आणि कर्णविषयी सत्य हळुहळू समजत गेले . बुद्धीला ते सत्य पटत होते मात्र मनाला पटत नव्हते . मग मात्र मृत्युंजय मधील अवास्तव , काल्पनिकतेवर असलेला भर हे सगळं स्पष्ट झालं मग कर्णापेक्षा कितीतरी पटीने मला इतर व्यक्तिरेखा भावल्या . विशेषतः भीष्मांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . कर्ण हा कुणी महात्मा /वीरपुरुष नसुन तो खलपुरुष होता हे देखील मला चिंतन केल्यावर समजु लागलं . शेवटी माझ्या मनावर दीर्घ काळ राज्य करणारा कर्ण माझ्या मनातुन अखेर हद्दपार झाला!! सुरुवातीला कर्णाच्या कृतींचं आम्ही समर्थन करायचो . आता मात्र तसं करताना स्वता:हाचीच लाज वाटु लागली . द्रौपदीला तो भर सभेत वेश्या म्हणाला असं वाचताना पुर्वी आम्हाला काही विशेष वाटलं नव्हतं पण आता मात्र तो विचार करतानाही मन धजवत होतं! भार्गव परशुरामांना असत्य सांगुन अंधारात ठेवणार्‍या कर्णाची प्रवृत्ती किती हिणकस असावी असं वाटु लागलं . गरीब ब्राह्मणाची गाय मारुन कर्णाला काय मिळालं? स्वता:हाच्या धनुर्विद्येच्या टिमक्या मिरविणारा कर्ण गांधर्व युद्धात निष्पभ्र का ठरला ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आणि कर्ण हा माझ्या मनात इतिहासजमा होवुन बसला! आजही मी मृत्युंजय वाचतो पण कर्णासाठी नाही तर त्यातील अमोघ भाषेसाठी . साहित्य कलाकृतींमध्ये मृत्युंजय फार वर आहे मात्र त्यात इतिहास मिसळला गेला तर अज्ञानाचं प्रदुषण पसरतं. `श्रीमान योगी`/`छावा` किंवा मृत्युंजय या कादंबर्‍या अवश्य वाचाव्यात पण त्यातील काल्पनिकता ही खरी मानु नये . किमान सुज्ञ आणि विवेकी वाचकाने ही गोष्ट नोंद करुन घ्यावी! कर्णाशी माझं काहीच वैर नाही . तो पराक्रमी होता , त्याने अनेक दिग्वीजयही केले , त्याच्या दानशुरपणाला तोड नाही हे सगळं खरं पण तो अराजक प्रवृत्तीला पाठिंबा देणारा अधर्मी होता असं व्यासांनी म्हटलयं . आम्ही नाही!! आज एकुणच कर्णाकडे वळुन पाहताना जास्त काही म्हणावसं वाटतं नाही . दोन ओळीच खुप आहेत , कर्णा , तु मृत्युंजय नव्हतास रे! मृत्युंजय नव्हतास!! धन्यवाद! ...Read more

  • Rating StarDatta Shinde Patil

    एक वेळ अवश्य वाचावं असं पुस्तक

  • Rating StarSomnath Rathod

    आज जेव्हा शिवाजी सावंत यांची लोकप्रिय कादंबरी मृत्यूंजय वाचून समाप्ती झाली तेव्हा कळाले. "अंगराज कर्ण. सुतपुञ कर्ण. कौरव दिग्विजयी सेनापती कर्ण .जेष्ठ कौंतिया कर्ण. राधेय कर्ण . साक्षात इंद्रदेवाला आपल्या दारात याचक म्हणून उभा करणारा दानीर कर्ण आपला मिञ दुर्योधन व कौरव पराभूत होणार माहीत असताना मिञाला दिलेल्या शब्द खातीर शेवट पर्यंत जिगरांने लढणारा कर्ण. मृत्यू च्या दारात उभा असताना याचक वृद्ध ब्राम्हणाला स्वतःचे दोन सोन्याचे दात दगडाने तोडून देण्याचे मुलाला आदेश देणारा दानविर कर्ण प्रत्येक माणसात एक कर्ण असतोच..! १० दिवस डोक्यात गरागरा फिरणारा कर्ण आज डोक्यासह शांत झाला.! कादंबरी कार शिवाजी सांवत ना कोटि कोटि प्रणाम. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more